शेती विषयक माहिती मराठी, शेतीचे प्रकार, महत्व, समस्या आणि अवजारे

शेती विषयक माहिती मराठी: शेती हा भारतातील अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे. भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला. परंतु शेती क्षेत्राचे महत्त्व अजूनही कमी झालेले नाही.

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा शेती क्षेत्र करत आहे. शेतीमुळे भारत देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे.

अगदी प्राचीन काळापासून मानव आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी शेती करत आला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे.

शेती विषयक माहिती मराठी” मध्ये शेतीचे विविध प्रकार, शेतीचे महत्त्व, शेती अवजारे, शेतीविषयक समस्या आणि विकासाबद्दल सखोल चर्चा करूया.

शेती विषयक महत्त्वाचे

  1. देशातील जवळपास 70 टक्के लोकांना शेती क्षेत्रातून रोजगार उपलब्ध होतो.
  2. साखर कापड व ज्यूट उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा शेतीतून होतो.
  3. भारतातून निर्यात होणाऱ्या शेतमालात 50% शेतमालाचा वाटा आहे.
  4. वाहतूक व दळणवळण सेवेचा विकास होत आहे.

शेतीचे मुख्य प्रकार

शेतीचे प्रकार वेगवेगळ्या पर्यावरणीय, भौगोलिक आणि सामाजिक घटकांवर आधारित असतात. शेतीचे काही महत्वाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

सेंद्रिय शेती

या शेतीपद्धतीमध्ये जमिनीची सुपीकता टिकवली जाते व वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. याउलट या शेतीमध्ये कंपोस्ट खत, गांडूळ खत व शेणखत या सेंद्रिय घटकांचा खत म्हणून वापर केला जातो.

सेंद्रिय शेती विषमुक्त असते त्यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये पिकवला जाणारा भाजीपाला फळे यांना बाजारात चांगला भाव मिळतो. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची उत्पादकता कायम टिकून राहण्यास मदत होते.

वनशेती

वनशेती पडीक जमिनीवर माळरानावर व डोंगर उतारावर केली जाते. वन शेतीमध्ये निंबोळी, बाभूळ, चिंच व सागवान या झाडांची वनशेती केली जाते.

वनशेतीतून चारा व लाकूड मिळते. वनशेतीमुळे जमिनीची धूप होत नाही. कमी पावसाच्या भागात देखील वन शेती केली जाते.

बांधकामासाठी व लाकडी उपयोगी वस्तू बनवण्याकरिता लागणारे लाकूड वनशेती मधून उपलब्ध होते.

बागायती शेती

बागायती शेती केवळ पावसाच्या पानावर अवलंबून नसते. बागायती शेतीमध्ये वर्षभर वेगवेगळे पिके घेतली जातात.

जिरायती शेती

जिरायती शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. या शेतीमध्ये वर्षातून दोनदा पिके घेतली जातात.

जिरायती शेतीमध्ये केवळ उदरनिर्वाची पिके घेतली जातात.

फुलशेती

मानवाचा फुलांशी फार काळापासून जवळचा संबंध आहे. सामाजिक, धार्मिक सण उत्सवावेळी फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

देश विदेशातुन निरनिराळ्या भारतीय फुलांची मागणी पाहता फुल शेतीला चांगले दिवस आलेले आहेत.

सध्या शेतकरी पारंपारिक फुल शेतीकडून आधुनिक व तांत्रिक अशा ग्रीनहाऊस मधील फुलशेतीकडे वळत आहे.

फुल शेतीमध्ये झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा व इतर निरनिराळ्या जातींच्या फुलांची लागवड केली जाते.

फळबागशेती

फळबाग शेतीमुळे शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध झाले आहे. या शेती पद्धतीमध्ये आंबा, चिकू, नारळ, केळी व डाळिंब अशा विविध फळांची लागवड केली जाते.

आंबा, नारळ व केळी यांसारखी फळे भारत देशातून विदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जातात. या फळबाग शेतीमुळे देशाला परकीय चलन प्राप्त होते.

फळबाग शेतीतून मिळणारे उत्पन्न पाहता अनेक शेतकरी पारंपारिक शेतीतून बाहेर पडत फळबाग शेतीकडे वळत आहेत.

भाजीपाला शेती

भाजीपाला शेतीला तरकारी शेती देखील म्हणतात. या शेतीमध्ये विविध भाजीपाल्याची पिके घेतली जातात.

भाजीपाला शेतीमध्ये कारले, वांगी, पालक, मेथी, कोथिंबीर आणि मिरची अशी विविध भाजीपाला पिके घेतली जातात.

या शेती करता जास्त जमिनीची आवश्यकता नसते. अगदी दहा गुंठे क्षेत्र असलेला शेतकरी सुद्धा भाजीपाला शेती करून हजारो रुपये कमवत आहे. भाजीपाला शेतीतून दररोज खेळता पैसा मिळवता येतो.

शेतीची अवजारे

1. ट्रॅक्टरचा शेतीत उपयोग

शेतीच्या विविध कामांसाठी ट्रॅक्टर व ट्रॅक्टरला जोडलेल्या यंत्रांचा वापर केला जातो.

ट्रॅक्टरच्या मदतीने शेतातील नांगरणी, कुळवणी, पेरणी, आंतर मशागत आणि शेतमालाची वाहतूक इत्यादी महत्त्वाची कामे केली जातात.

2. पावर टिलर

पावर टिलर हा एक प्रकारे लहान ट्रॅक्टरचा असतो. या यंत्राचा वापर शेत जमिनीची नांगरणी, कुळवणी, जमिनीचे सपाटीकरण करणे, बांध घालणे, सरी वरंबे घालणे, रोपांसाठी आळी तयार करणे, वाहतूक करणे अशी अनेक कामे केली जातात.

3. ट्रेलर

पूर्वी शेतातील धान्याची पोती, वैरण व इतर शेतमाल वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर करत असत.

सध्या शेतीमध्ये खते, बियाणे, शेती अवजारे यांची वाहतूक टेलर द्वारे केली जाते. वाहतुकीकरिता टेलर ट्रॅक्टरला जोडल जाते.

4. खुरपणी/कोळपणी यंत्र

पेरणीनंतर पिकात तणाचा शिरकाव होतो. तण जोमाने वाढते. पिकातील तण न काढल्यास पिकांची वाढ खुंटते. म्हणून वेळीच तन नष्ट करावे लागते.

बाजारात स्वयंचलित कोळपणी यंत्र उपलब्ध आहेत त्याच्या मदतीने लवकर खुरपणी उरकली जाते. मानवचलित व स्वयंचलित खुरपणी यंत्राच्या मदतीने पिकांतील तणावर नियंत्रण ठेवता येते.

खुरपणी केल्यामुळे पिकांच्या अवतीभोवती पावसाच्या पाण्याने तयार झालेला मातीचा पापुद्रा फुटतो. मातीचे पापुद्रे फुटल्यामुळे पिकांच्या मुळांना प्राणवायू मिळण्यास मदत होते.

शेतीतील कामाच्या प्रक्रिया

1. नांगरणी

शेत जमीनीची मशागत करण्यापूर्वी जमीनीची नांगरणी केली जाते. जमिनीची नांगरणी केल्यामुळे जमिनीवरील पिकांचे अवशेष फणे, तन व पालापाचोळा जमीनीत गाडला जातो.

जमिनीतील हे अवशेष जमीनीत गाडले गेल्यामुळे पिकांना कंपोस्ट खत तयार होते.

2. कुळवणी

जमिनीची नांगरणी केल्यानंतर कुळवणी केली जाते. कुळवणी केल्यामुळे जमिनीतील ढेकळे फुटतात व जमीन सपाट भुसभुशीत बनते. नांगरणीपेक्षा कुळवणीसाठी कमी वेळ व कमी खर्च लागतो.

3. पेरणी

जमिनीची कुळवणी झाल्यानंतर जमीन बी पेरण्यास योग्य बनते. जमिनीच्या चांगल्या मशागतीमुळे जमिनीत हवा, पाणी व मुळ्या यांचा मुक्त संचार होण्यास मदत होते.

या प्रक्रियेत पेरणी यंत्राच्या साह्याने बी पेरले जातात. पेरणी यंत्रामुळे बी समान खोलीवर व समान अंतरावर पेरले जातात.

4. पिकांची कापणी

पिकांची योग्य वाढ झाल्यानंतर पिकांची कापणी केली जाते. ऊस कापणी करता ऊस कापणी यंत्राचा वापर केला जातो.

गहू कापणी करता गहू कापणी यंत्राचा वापर केला जातो. करडी कापणीसाठी करडी कापणी यंत्राचा वापर केला जातो.

वैरण कापणीसाठी वैरण कापणी यंत्राचा वापर केला जातो. ज्यावेळी कापणी यंत्र उपलब्ध असतात अशावेळी शेतकरी मजुरांच्या मदतीने शेतातील पिकांची कापणी करून घेतो.

5. पिकांची मळणी

या प्रक्रियेत धान्य मळणी यंत्राच्या मदतीने पिकांची मळणी केली जाते. कम्बाइन हार्वेस्टर या यंत्राने कापणी व मळणी एकाच वेळी केली जाते.

6. शेतमालाची/धान्यांची साठवणूक

पिकांची मळणी केल्यानंतर धान्यांची कोरड्या जागेवर साठवणूक केली जाते. धान्यांना उंदीर कीड व बुरशी लागू नये याकरता विशेष काळजी घेऊन धान्यांची साठवणूक गोडाऊनात केली जाते.

शेती व्यवसायातील प्रमुख समस्या

तसे पाहिले तर शेती व्यवसायात अनेक समस्या आहेत. खाली आपण शेती व्यवसायातील काही प्रमुख समस्या जाणून घेऊया.

  1. शेतमजूर वेळेवर न मिळणे.
  2. पावसाची अनिश्चितता.
  3. शेतमालाला किफायतशीर भाव न मिळणे.
  4. कृषी पंपासाठी पुरेसा वीज पुरवठा उपलब्ध न होणे.
  5. खते बियाणांच्या वाढत्या किमतीमुळे भांडवल अपुरे पडणे.
  6. शेतकऱ्यांचे शेतीकडे दुर्लक्ष.
  7. वन्य प्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान.
  8. पिकांची चोरी.
  9. शेत रस्ता आणि शेत वाटणीचे वाद.

अशा अनेक शेती व्यवसायात समस्या आहेत.

या “शेती विषयक माहिती मराठी” मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर कृषी क्षेत्राच्या विकासास मदत होईल. आणि शेतकऱ्यांना शेतीबद्दल आवश्यक ज्ञान मिळेल.

Leave a Comment