दिवसाची कमाई चारपट देणारे 8 ग्रामीण भागातील व्यवसाय

सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता केलेली शेती होय. म्हणजेच सेंद्रिय शेती ही विषमुक्त शेती असते. आज लोक खूप जागरूक झाले आहेत सुशिक्षित ग्राहक हे जास्तकरून सेंद्रिय शेतीमध्ये पिकवलेला भाजीपाला खाणे पसंत करतात. यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते.

सेंद्रिय शेतीमध्ये पिकवलेला भाजीपाला खाल्याने शरीरात कोणत्याही प्रकारचे रासायनिक विष जात नाही परिणामी त्यांचे शरीर रोगमुक्त राहते.

सेंद्रिय शेतीचे असंख्य फायदे असल्यामुळे आणि सेंद्रिय शेतीतील शेतमालाला शहरामध्ये, परदेशात फार मोठी मागणी आहे.

शिकलेला वर्ग जास्तकरून सेंद्रिय फळे, भाजीपाला, कडधान्ये खाणे पसंत करतो. सेंद्रिय शेतीची वाढती मागणी पाहता तुम्ही देखील तुमच्या शेतीमध्ये सेंद्रिय शेतीचा प्रयोग करू शकता. थोडेसे आवश्यक ज्ञान मिळवल्यास व नियोजन केल्यास सेंद्रिय शेती तुमच्यासाठी वरदान ठरू शकते.

ग्रामीण भागातील व्यवसाय

आपल्या देशात मांसाहार करणार्‍या लोकांची संख्या भरपूर आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बोकडांचे व बकर्‍याचे मांस लोक चवीने खातात. बोकडाच्या मांसाला मोठी मागणी असल्यामुळे शेळ्या मेंढ्यांची खरेदी विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात होते.

तुम्हाला या व्यवसायात फार काही करायचे नाही तुम्हाला फक्त एका शेळ्यामेंढयाच्या बाजारातून काही बोकड किंवा शेळ्या विकत घ्यायच्या आहेत. आणि त्या दुसर्‍या शहराच्या शेळ्यामेंढयाच्या बाजारात जाऊन किमंत वाढवून विकायच्या आहेत.

उदाहरणार्थ तुम्ही जर एक बोकड 8 हजार रुपयाला विकत घेतला तर तुम्ही तो पुढे 10 हजार रुपयाला विकू शकता.

म्हणजे एका बोकडापाठीमागे तुमची कमाई 2 हजार रुपये होते. हळू हळू तुम्ही शेळ्या मेंढया खरेदी व विक्रीची संख्या वाढवू शकता व जास्तीत जास्त नफा मिळवू शकता.

हा एक खूप कमी भांडवली व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्या जवळ मोटार दुरूस्ती व वायडिंगचे ज्ञान असावे लागणार आहे त्यासाठी तुम्ही आयटीआय मधील मोटार वायडिंगचा कोर्स देखील करू शकता. किंवा आसपासच्या मोटार दुरुस्त करणार्‍या मिस्त्री कडे देखील याचे प्रशिक्षण घेऊ शकता.

शेतीसाठी लागणार्‍या विद्युत पंपाची शेतकर्‍यांना फार गरज असते, ती खराब झाल्यास ती लवकर दुरुस्त करून घ्यावी लागते कारण शेतीमध्ये पिकांना पाणी देणे ही सर्वात महत्वाची बाब असल्यामुळे शेतकरी कोणत्याही परिस्थितीत पाण्याची मोटार दुरुस्त करून घेतो.

अन्न ही माणसाची सर्वात महत्वाची गरज आहे. भाकरी चपाती तसेच इतर खाद्य पदार्थ बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या धान्य पीठांचा वापर केला जातो.

त्यामुळे प्रत्येक घरात महिन्याचे राशन भरताना बाजरी, गहू, ज्वारी, हरभरे, अशा धान्यांचा समावेश असतो.

प्रत्येक गावात तुम्हाला धान्य दुकाने पाहायला मिळतील आणि अशी दुकाने महिन्याला चांगली कमाई देखील करतात.

ज्या ऋतुमध्ये जे धान्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल ते धान्य तुम्हाला तुमच्या दुकानात आसपासच्या शेतकर्‍याकडून विकत घेऊन साठवून ठेवायचे आहे.

मार्केटमध्ये ज्या वेळी त्या धान्याचा तुटवडा भासेल त्यावेळी त्या धान्याला चांगली किमंत मिळेल. मूग, मटकी, हरभरा, चवळी, बाजरी, गहू, ज्वारी, असे अनेक प्रकारचे धान्य तुम्ही तुमच्या स्वस्त धान्य दुकानात विक्रीस ठेऊ शकता.

Read this: vyavsay ka karava aani asa karava

आजकाल चिकन खाणे कोणाला आवडत नाही. दिवसेंदिवस बोकडाचे महाग होत जाणारे मांस सर्व सामान्य लोकांच्या खिशाला परवडत नाही. अशा सर्वसामान्य लोकांच्या पुढे चिकन हा अगदी स्वस्त पर्याय असतो.

मग काय चिकन घेताना लोक एक किलोच्या वर चिकन घेतात आणि दाबून खातात. चिकन हा विषय सध्यातरी मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंगला आहे.

चिकन पासून विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात. चिकन सूप असेल, चिकन फ्राय असेल, चिकन मसाला असेल, चिकन करी असेल, चिकन बिर्याणी असेल असे अनेक पदार्थ चिकन पासून बनवले जातात.

त्यामुळे लहान मुलांपासून थोर व्यक्तिपर्यंत सर्वजण चिकनचे चाहते आहेत. हा व्यवसाय कुठेही चालू शकतो. छोटेसे पत्र्याचे दुकान टाकून तुम्ही हा व्यवसाय सहज सुरू करू शकता.

बॉयलर कोंबडी उत्पादन करणार्‍या कंपनीशी करार करून त्यांच्याकडून बॉयलर कोंबड्या विकत घेऊन हा चिकन शॉपचा धंदा सुरू करता येतो.

सुरूवातीला तुम्ही तुमच्या आसपास बॉयलर कोंबडी पालन करणार्‍या व्यवसायिकाकडून कमी बॉयलर कोंबड्या खरेदी करून हा धंदा सुरू करू शकता.

आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला जर हा व्यवसाय स्वता करताना लाज वाटत असेल तर तुम्ही एखादा बिहारी किंवा युपीवाला माणूस दुकानात कामाला ठेऊ शकता.

कमाईच म्हणालं तर कमाई जबरदस्त होईल कारण स्वस्त मिळणारे चिकन हे सर्वांना खायला आवडते.

दुचाकी ही काळाची गरज आहे. शेतकर्‍यापासून ते नोकरदारापर्यंत सर्वजण दुचाकीचा वापर करतात. शेतकरी भाजीपाला, वैरण, दूध, धान्य इत्यादि पदार्थ दुचाकीवर टाकून वाहून आणतो, तर नोकरदार नोकरीच्या ठिकाण ते घर पोहचण्यासाठी दुचाकीचा वापर करतो.

दुचाकीच्या रोजच्या वापरामुळे ती कधी पंक्चर तर कधी टायर मधली हवा जात असते. अशावेळी दुचाकी टायरचा पंक्चर काढण्यासाठी टायर मधली हवा भरण्यासाठी जवळच्या पंक्चर दुकानात घेऊन जावी लागते.

तुम्ही तर तुमच्या आसपास असणार्‍या टायर पंक्चरच्या दुकानात दुचाकींची असलेली गर्दी नक्की पाहिली असेल. यावरून त्यांचा दररोजचा किती धंदा होत असेल हे तुमच्या लक्षात आले असेलच.

टायर जर ट्यूबलेस असेल तर एका पंक्चरचे 70 रुपये घेतात.

आणि टायर जर ट्यूबचा असेल तर एका पंक्चरचे 50 रुपये घेतात. आता सगळ्याच गाड्यांना ट्यूबलेस टायर आहेत, त्यामुळे जर एका गाडीचे दोन पंक्चर काढले तर तुम्हाला 140 रुपये मिळतील.

आणि दिवसात 10 गाड्यांचे पंक्चर काढले तर दोन पंक्चर प्रत्येकी जर पकडले तर 10×70 म्हणजे 700 रुपये तुमची दिवसाची कमाई होते.

मार्केटमध्ये एलईडी ब्लब हा सर्वात स्वस्त व कमी वीज लागणारा बल्ब आला आहे. यापूर्वी मार्केटमध्ये 60 वॉट ते 100 वॉट पर्यंतचे ब्लब वापरले जात असत.

यापूर्वी अशा 60 वॉट ते 100 वॉट बल्बला लागणारा विजेचा खर्च देखील खूप मोठा होता. फिलिपस, विप्रो, पॅनासॉनिक, बजाज अशा अनेक कंपन्यांचे ब्लब तुम्हाला आज पाहायला मिळतील.

बर्‍याच कंपन्या एलईडी बल्ब तयार करून चांगली कमाई देखील करत आहेत. काही ठिकाणी तर लोकल कंपन्यांनी सुद्धा एलईडी ब्लब विक्रीत आपले नाव मार्केट मध्ये तयार केले आहे.

आता तुम्ही म्हणाला कि मार्केटमध्ये बर्‍याच मोठ मोठ्या कंपन्यांचे एलईडी बल्ब आहेत तर आमचा बल्ब कसा विकला जाणारा,

तर तुमच्या माहितीसाठी सांगतो अशा मोठ्या कंपन्यांचे बल्ब खूप महाग आहेत, त्यामुळे सहसा सर्वसामान्य लोक असे बल्ब खरेदी करत नाहीत.

तुम्ही जर बारकाईने पाहिले तर आसपासच्या गावांच्या आठवडी बाजारात एलईडी बल्ब तयार करणारे लोक ओमनी, पिकअप, सारख्या गाड्या विकत घेऊन त्यात एलईडी ब्लबची विक्री करत आहेत.

आता तुमच्यासमोर हा प्रश्न उभा राहिला असेल कि हा व्यवसाय सुरू कसा करायचा तर तुमच्या माहितीसाठी सांगतो एलईडी ब्लब बनवणारी मार्केटमध्ये मशीन मिळते आणि बल्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य देखील मिळते,

ते खरेदी करून तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात करू शकता. आता प्रश्न येतो तो प्रशिक्षणाचा तर प्रशिक्षणाच म्हणाल तर जी कंपनी तुम्हाला ही मशीन देईल त्या कंपनीचा प्रतिनिधी तुम्हाला बल्ब तयार करण्याचे व ब्लबला लागणारे होलसेल साहित्य कुठे मिळेल याची सविस्तर माहिती देईल.

तुम्हाला घरोघरी गॅस शेगडी पाहायला मिळेल, गॅसवर दररोज स्वयंपाक करावा लागत असल्यामुळे गॅसमध्ये पाणी जाऊन, गॅस पाईप, गॅस नळी, सतत खराब होत असते. कधी कधी रेग्युलेटर सुद्धा खराब होतो.

गॅसच्या सतत वापरामुळे किंवा गॅसच्या चुकीच्या वापर पद्धतीमुळे गॅस सारखा दुरुस्त करावा लागतो. ग्रामीण भागातील महिला गॅस खराब झाल्यावर शहरात दुरूस्तीसाठी घेऊन जातात त्यामुळे त्यांचा महत्वाचा वेळ व पैसा देखील खर्च होतो.

जर अशा महिलांना गॅस दुरूस्तीचे दुकान जर त्यांच्याच गावात किंवा शेजारच्या गावात मिळाले तर त्या कशाला शहरात गॅस शेगडी दुरूस्तीसाठी घेऊन जातील. त्या त्यांच्याच गावातील गॅस दुरूस्ती दुकानातून गॅस दुरुस्त करून घेतील.

गॅस शेगडीची नुसती सर्विसिंग जरी करायची झाली तरी गॅस दुरुस्तीवाले एका गॅस शेगडी सर्विसिंगसाठी दीडशे रुपये घेतात. तुम्ही दहा शेगड्या जरी दुरुस्त केल्या तर तुमची दिवसाची कमाई 1500 रुपये होऊ शकते.

ग्रामीण भागातील बरेचसे व्यवसाय हे शेतीवर अवलंबून आहेत. अलीकडे ग्रामीण भागातील शेतकरी देखील तंत्रज्ञानाच्या आधारे शेती करत असल्यामुळे त्यांना शेतीवर आधारित ग्रामीण भागातील व्यवसायांचे महत्व समजले आहेत.

आम्ही वरती दिलेले ग्रामीण भागातील व्यवसाय हे नक्कीच शेतकरी व शेतमजुर अथवा शेतकरी पुत्र असू द्या या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरतील अशी आशा आहे.

ज्या तरुणांना शहरातील नोकरीमध्ये रस नाही असे तरुण देखील ग्रामीण भागात राहून आपली व्यावसायिक वाटचाल सुरू ठेऊ शकतात.

Spread the love

About Uday Waghmare

Uday Waghmare is the author of this blog. He is passionate about writing in the field of business and is trying his best to provide business-related information in the Marathi language on this blog.

View all posts by Uday Waghmare →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *